विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या वेळी तात्कालीक प्रसंगावर भाष्य करणाऱ्या व संपूर्ण राज्यात लोकप्रिय ठरलेल्या माझ्या वात्रटिकांचा खजिना मार्मिक ठोसे या सदराखाली मी आपल्या समोर सादर करत आहे . . . .
१)
भारतात आहे लोकशाही
बातमी निव्वळ फेक आहे.
जिकडे जावे तिकडे पहा
घराणेशाहीची मेख आहे.
२)
आलाच पाहिजे आलाच पाहिजे
जनतेची जोशात 'घोषणा ' आहे.
निवडणूकीनंतर लुटण्याची मात्र
नेत्यांच्या मनात 'वासना ' आहे.
३)
निवडणूकीच्या बाजारात
उमेदवारीचा जंगी सेल आहे.
पैशाअभावी तिकीटासाठी
सामान्य कार्यकर्ता फेल आहे.
४ )
मवाळ नाहीच कुणीही
नुसताच आहे राडा.
भाऊबंदकी उफाळली
मावळ असो वा माढा.
........जयवंत जाधव, कोवाड
जि. कोल्हापूर
9403463881
No comments:
Post a Comment