'भावनेपेक्षा कर्तृत्व श्रेष्ठ' ही निती
मेंदूपर्यत कुणाच्या पोचलीच नाही.
घराणेशाहीच्या या भारत देशात
लोकशाही कधी रुजलीच नाही . ॥धृ॥
खालचा खाली आणि वरचा वरच
विषमतेची दरी कधी मुजलीच नाही.
गीता , कुराण , बायबलच्या गर्दीत
'घटना' कुणी कधी पुजलीच नाही.
घराणेशाहीच्या या भारत देशात
लोकशाही कधी रुजलीच नाही . ॥ १ ॥
तुडूंब भरल्या तिजोऱ्या तरी
लुटारुंची हाव कधी भागलीच नाही.
खंडणी, लाच घेतांना नेत्यांसह
नोकरशाहीही कधी लाजलीच नाही
घराणेशाहीच्या या भारत देशात
लोकशाही कधी रुजलीच नाही ॥ २ ॥
विरोधात असता 'विकासाची बात'
सत्तेत प्रगती कधी सुचलीच नाही
विरोधासाठीच विरोध केवळ
चांगल्यासाठी टाळी कधी वाजलीच नाही.
घराणेशाहीच्या या भारत देशात
लोकशाही कधी रुजलीच नाही. ॥ ३ ॥
गुलामगिरीचे ढग जमले देशावर
स्वातंत्र्यात जनता कधी भिजलीच नाही.
खऱ्या लोकशाहीसाठी मतदारांनी
प्रबळ 'मत निती' कधी योजलीच नाही.
घराणेशाहीच्या या भारत देशात
लोकशाही कधी रुजलीच नाही ॥ ४ ॥
@ जयवंत जाधव, कोवाड
ता.चंदगड जि. कोल्हापूर
मोबाईल - 9403463881