.....वात्रटिका
४०)
नामांकन पत्रातून आम्हाला आता
त्यांची मत्ता 'कळणार' आहे.
कोटीं,अब्ज पाहून कांहीजण 'थक्क'
तर काहीजणांंची 'जळणार' आहे.
४१)
कोटी पटीने वाढणाऱ्या
संपतीवर 'हरकत' आहे.
जनतेलाही कळू दे फंडा
कशाने एवढी 'बरकत' आहे
४२)
पावसा सारखाच *अवकाळी*
आश्वासनांचा *जोर* आहे.
स्वातंत्र्यापासुन *गरिबी हटाव*
घोषणा खरंच *थोर* आहे.
..... जयवंत जाधव, कोवाड
जि. कोल्हापूर
9403463881
No comments:
Post a Comment