......वात्रटिका
३७)
'बळी'राजासोबत असतो 'सदा'
पोकळ यांचा दावा आहे.
सत्ता मिळताच टांग मारणे
भाऊंचा स्वार्थी कावा आहे.
३८)
वरुन हल्ला, आतून डल्ला
जनतेला 'ही' भूल आहे.
आतून वासना सत्तेची आणि
वरुन सेवेची झुल आहे.
३९)
कोल्हापूरात अंबाबाईचा
'अवतार' अगदी विराट आहे.
साताऱ्यातील राजेंचा 'उदय'
आणि 'पावर' ही तऱ्हाट आहे.
.......... जयवंत जाधव, कोवाड
जि. कोल्हापूर
9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा