वात्रटिका
५ )
नामदारांच्या वारसांचा
'खास'दारकीचा हट्ट आहे.
पक्षापेक्षा राजकारण्यांचं
रक्ताशी नातं घट्ट आहे.
६ )
प्रेम वगैरे काही नाही
घातली स्वार्थी 'गळ ' आहे.
आपल्यापेक्षा मोठा होईल
आतली खरी कळ आहे.
७ )
निष्ठेमध्ये लवचिकता
धोरणात थोडी फट आहे.
'एकाच' घरात 'प्रत्येकाचा'
'वेगळावेगळा' 'गट' आहे.
८ )
बेडूकरावांच्या स्वागताला
रंगीबेरंगी गुच्छ आहे.
तिकडे असता 'घाणेरडा'
ईकडे येताच 'स्वच्छ' आहे.
....... जयवंत जाधव,कोवाड
जि. कोल्हापूर
9403463881
No comments:
Post a Comment