मार्मिक ठोसे
(वात्रटिका)
२५७
कवडीला मोल नाही तर
कवडी वर बोलणेही व्यर्थ आहे.
उगाच बोलणं असणार नाही
नक्कीच काही तरी अर्थ आहे
२५८
रामा वरून महाभारत घडतेय
सारथी उद्धवा विरुद्ध पार्थ आहे . !
पितामह बोलतात ते सत्यच असते
'संजय'च्या बोलण्यातही स्वार्थ आहे .
मामा कडचे बोलले म्हणे
भांज्या खुप 'फायटर' आहे .
पसरलेल्या पेट्रोल मध्येच त्यांनी
हळूच पेटवलं 'लायटर' आहे .
२६०
काकांच्या गळ्यातील ताईत
पवार हि'रो हिट' आहे.
नेहमी 'अ जीत' पावरबाजचा पुत्र
अजूनही अनफिट आहे.
२६१
काकांना न ओळखण्या इतपत
पुतणे का इतके खुळे आहेत ?
खायला मदत दा(दा)तांची पाहिजे
पण सु प्रिय मात्र 'सुळे' आहेत .
२६२
रामा साठी उद्धवशी वैरत्व
खरंच का पार्थ भोळा आहे (?)
भाऊबंदकीच्या कलहाकडे मात्र
बिलंदर देव इंद्राचा डोळा आहे .
© जयवंत जाधव, कोवाड
ता.चंदगड जि कोल्हापूर
मो 9403463881
अप्रतिम
ReplyDelete