...... वात्रटिका
१२)
खड्डे भरलेल्या रस्त्यांना
भला मोठा 'टोल' आहे.
मुंबईतील पुलांच्या निधीला
खड्डया एवढा 'होल' आहे.
१३ )
कुणाचं बेगडी प्रेम तर
कुणाचं वैर खोटं आहे,
कधी यांच्यात 'धूमशान'
तर कधी साटंलोटं आहे.
१४ )
'आठवले' ते सांगतो 'जाणकारा'ना
इथे जनाधाराची 'अट' आहे.
नामदार होऊनही काम नाही
म्हणून यांचा पत्ता 'कट' आहे.
........ जयवंत जाधव, कोवाड.
जि. कोल्हापूर
9403463881
nice
ReplyDelete