( वात्रटिका )
२४८)
सगळे राबले तरच घर चालतं
सगळ्यांना हे उमजलं पाहिजे.
देश राज्य चालवणे खुपच कठीण
सुज्ञ नागरिकांना समजलं पाहिजे.
२४९)
कर भरणारे कमी लाभार्थीच जास्त
मध्यमवर्गिय मात्र पिसला आहे .
करदात्यांच्या संपतीवर सरकारने
कष्टाविना फुकटा पोसला आहे .
२५०)
मजूर मिळेनात शेतीसाठी एकीकडे
रोजगार नाही ही दुसरीकडे बोंब आहे.
रोजगार हमी योजना राबवावी शेतीमध्ये
मनात फुटलेला आशेचा एक कोंब आहे .
२ ५१)
कर्ज,व्याज अणि विविध कर
कुणाला मुळीच नाही द्यायचं आहे .
सगळ्या सुविधा मात्र तत्पर हव्यात
अनुदानही प्रत्येकालाच घ्यायचं आहे .
© जयवंत जाधव, कोवाड.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
No comments:
Post a Comment