खुर्चीसाठी
होती निष्ठा देशप्रेम
प्रबळ इच्छा शक्ती
राजकारणात सेवा
प्रजेबाबत भक्ती
दिवस ते बदलले
बदलले सारे नेते
वेळ आली म्हणायची
पहिलेच बरे होते
देशप्रेम आणि निष्ठा
केंव्हाच गेली उडत
नेते करती मौजा
प्रजा बसली रडत
सत्तेमुळे येतो पैसा
पैशांमुळे पुन्हा सत्ता
खर्चीसाठी मुडदे नि
तुडवी नितीमत्ता
समाज हिताची जर
आहे थोडी कणव
आरशासारखा लख्ख
देश पवित्र बनव....!
©जयवंत जाधव, कोवाड
ता चंदगड जि कोल्हापूर
मो .9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा